

आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह; पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला उजाळा

आश्वी,वैभव ताजणे,7709254924


आपल्या परिसराला फार मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, तो जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजसेवा केली. त्या काळात जादूटोणा किंवा अंधश्रद्धेऐवजी झाडपाल्यांपासून तयार केलेली औषधे देऊन त्यांनी असंख्य आजारी भक्तांना बरे केले. पूंजाआईंनी दिलेला हा आयुर्वेदीय आणि आध्यात्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असून, हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा टिकवण्यासाठी अशा थोर संतांचा विचार जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त पूंजाआई मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या त्रिदिनी सप्ताह सदिच्छा भेटी प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.


पुढे बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की,पूंजाआई या अत्यंत साधी, तपस्वी व शिवभक्त जीवन जगणाऱ्या थोर संत होत्या. त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळत शिवभक्ती, सेवा आणि औषधी ज्ञान यांचा संगम साधला. डोंगरदऱ्यांत आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींचे सखोल ज्ञान त्यांना होते. आजारपणाने त्रस्त असलेल्या भक्तांना त्या निःस्वार्थपणे औषधे देत असत. त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून आजही ग्रामस्थ पूंजाआईंना श्रद्धेने स्मरतात.

त्रिदिनी सप्ताहानिमित्त पारायणासाठी बसलेल्या लाडक्या बहिणींचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या श्रद्धेमुळेच कुटुंबातील पुरुष वर्ग निर्धास्तपणे घराबाहेर जाऊन कष्टाचे काम करू शकतो. पूंजाआई यांच्या ठायी विलक्षण आध्यात्मिक शक्ती होती. त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर भक्तांना आत्मिक समाधान आणि मानसिक शांतता लाभते असे ही जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.





या कार्यक्रमास संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी उपस्थित राहून पूंजाआईंचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापुसाहेब गायकवाड, कारखान्याचे संचालक ॲड अनिल भोसले,पत्रकार संजय गायकवाड, उपसरपंच बाबा भवर,प्राध्यापक कान्हु गिते, मोहीत गायकवाड,कैलास गायकवाड, संतोष भडकवाड, बाबा भोसले, शरद सोनवणे, सोपान सोनवणे, संजय भोसले, मनोज कहार, दगडु गायकवाड, कृष्णा कहार, लक्ष्मण भोसले, अमोल गायकवाड, संजय देशमुख, ह.भ.प. सुनिल पवार, अमिरत यरमल, अमोल भडकवाड, मनोज मेहरे, दिपक सोनवणे, सुजित क्षिरसागर, विकास गायकवाड, गैरव मुन्तोडे, आशिष गायकवाड, संजय साबळे, अतुल भोकरे,अनिल सोनवणे, किरण बिडवे, उमेश सालकर, अदिनाथ जाधव, अमोल जाधव ,स्वप्नील गायकवाड, जगदिश मुसमाडे, रामा गायकवाड, अविनाश सोनवणे, तुषार गायकवाड, भास्कर वाल्हेकर, रामा क्षिरसागर,दत्ता गायकवाड आदींनी विशेष योगदान दिले.

0 Comments